Saturday 18 March 2023

शेतीचे प्रकार.

 शेतीचे  विविध प्रकार :-

                                         आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सुमारे ६५-७०% जनता शेती अथवा शेती निगडित व्यवसायांवर अवलंबून आहे.शेतीतून माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजा भागवल्या जातात.उत्पादन खर्च, विक्री खर्च, उत्पादनातील अवास्तव वाढ किंवा घट, बाजारपेठेची मागणी, जमिनींच्या किमती, उपलब्ध भांडवल, मजूर पुरवठा, पिकावरील कीड व रोग यांचा सर्वांगीण होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतीचे उद्देश व प्रकार निश्चित केले जातात. त्यांची थोडक्यात माहिती घेऊ-:

 जिरायती शेती :-

                    चांगले पर्जन्यमान असणाऱ्या जमिनीत ही पिके घेतली जातात. भारतातील काही भागात खरीप (पावसाळी शेती) व रब्बी (हिवाळी शेती) अशा दोन हंगामांत पिके घेणे शक्य असते. या प्रकारच्या शेतीत खताचा मुबलक वापर करता येतो. आच्छादनाचा वापर करून जिरायती शेती जास्त फायदेशीर करता येते. भारतातील अनेक राज्यात अशा प्रकारची शेती करतात. भारत हा ७०% पाण्याने व्यापला असून जिरायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. अलिकडच्या काळात नदीच्या पाण्यावर शेती जास्त प्रमाणात केली जाते.

बागायती शेती :-


                               वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून पिके काढण्याची एक पद्धत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात. म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिरायती पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे पूर्ण वर्षभर पिके घेतली जातात. पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक करून ही शेती केली जाते. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा. काळजीपूर्वकतेने बागायती शेतीतील अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे फार महत्वाचे असते. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब-थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करण्याची समस्या असते.

बारमाही बागायती शेती :-


                              या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने ‘खरीप’ व ‘रब्बी’ हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात. बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन ‘विहीर बागायत’, ‘धरणाखालील बागायत’ किंवा ‘उपसा सिंचन बागायत’ असेही प्रकार करतात. पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीवरून बागायत शेतीचे ‘पाटपाणी बागायत’, ‘ठिबक सिंचन’, ‘फवारा सिंचन’, ‘तुषार सिंचन’, ‘मटका सिंचन’ असेही प्रकार करतात.

फळबाग शेती :-


                       या प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवामान व पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळपिकांना पोषक असते. महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळपिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर केळीचे पीक उत्तम प्रकारे घेता येते. फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आंबा, चिकू, नारळ, सुपारी इत्यादी. परंतु संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते.फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

कोरडवाहू फळबाग शेती :-


                      ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा उपलब्ध सिंचन सुविधा अत्यल्प व हंगामी स्वरूपाची आहे, अशा ठिकाणी बोर, डाळिंब, आवळा, सीताफळ इ. फळझाडांची लागवड करून कोरडवाहू फळबाग शेती केली जाते. पाण्याची अत्यल्प उपलब्धता असूनही कोरडवाहू फळबागा चांगले उत्पन्न मिळवून देतात. पाणी कमी लागत असल्याने ही शेती केली जाते.

मिश्र शेती :-


               यात पिके व पशुधन याचा समावेश होतो.रोखविक्री करून द्रव्यार्जन करण्यासाठी पिके घेतली जातात तर पशुधन संवर्धनातून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करता येते. शेतीमध्ये लावलेल्या पिकांच्या उरलेल्या काडांचा जनावरांना वैरण म्हणून उपयोग करता येतो व जनावरांच्या मलमूत्राचा खत म्हणून उपयोग होऊ शकतो.अशा शेतीच्या उत्पादनात बरीच शाश्वती असते व जोखीम कमी असते. अलीकडे यात यांत्रिकीकरणही येऊ लागले आहे. शेतात वेगवेगळी आंतरपिके,एकेरी अगर बहुविध पिके ही घेता येतात.

संरक्षित शेती :- 

                 कमी क्षेत्रातून जास्तीत-जास्त उत्पन्न काढण्याच्या उद्देशाने जमीन हवामान, उष्णता, आर्द्रता इ. नैसर्गिक घटकांवर नियंत्रण ठेवून नगदी पिकांचे उत्पादन हरितगृहात घेतली जाते. हरितगृहाचे अनियंत्रित, अंशत: नियंत्रित किंवा पूर्ण नियंत्रित असे तीन प्रकार असतात. हरितगृहामध्ये अलीकडे गुलाब, कार्नेशन, जरबेरा, ट्यूलिप इ. फुलांची शेती यशस्वीरित्या केली जाते.

No comments:

Post a Comment

भारतीय शेतकऱ्यांच्या या मंदीला जबाबदार कोण?

 भारतीय शेतकऱ्यांच्या या मंदीला जबाबदार कोण?                   शेतकरी संपूर्ण देशाच्या लोकसंख्येला अन्न पुरवतात. ते फक्त जे उरले आहे तेच खात...